Wednesday 16 February 2011

मुलींचं production बंद पडतंय


नुकतंच वाचण्यात आलं कुठेतरी कि मुलींचं प्रमाण झपाट्यानी घाटतंय. त्या लेखात नमूद केलेले आकडे बघून माझी खात्री पटली कि तो लेख नक्कीच उत्तरप्रदेश, बिहार किंवा तत्सम उत्तर भरतीय राज्यांमधल्या statistics वर बेतलेला असणार म्हणून.
मी मनात म्हटलं, सहाजिकच आहे. तिकडची लोकं आहेतच मागास मानसिकतेची. सगळ्यांना आपला वंश चालवायला मुलगाच लागतो. मुलींचं potential ह्यांना कसं कळणार? ह्यांनी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांना इतकं जखडून ठेवलंय कि त्यांना स्वत:च्या इच्छेनुसार श्वास घ्यायची ही मुभा नाहीये. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगणं, आपलं अस्तित्त्व जपणं वगैरे गोष्टी त्यांच्या लेखी स्त्रियांसाठी नाहीचेत. ज्या प्रदेशात स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, सुरक्षितता नाही, जिथे स्त्रियांना प्रत्येक पायरीवर खालचाच दर्जा दिला जातो, ज्यांचा जन्म हा घरच्यांसाठी सगळ्याच दृष्टीकोनातून 'एक डोकेदुखी' म्हणून बघितला जातो, तिथेच हा जन्मदर असं भयंकर असणार असा माझा ठाम विश्वास होता.

हो, होता म्हणतेय मी. कारण त्या लेखावरून नजर फिरवताच मला जबरदस्त धक्का बसला. स्त्री गर्भाचं दर हजारा मागचं प्रमाण 777 आणि 858 ही संख्या कुठल्याही तथाकथित स्त्री द्वेष्ट्या राज्यातलं नसून माझ्या मते अतिशय पुरोगामी असणाऱ्या माझ्याच महाराष्ट्रातलं होतं..आहे.
आणि इथे मी नमूद केलेले हे आकडे आहेत अनुक्रमे मुंबई आणि ठाणे ह्या जिल्ह्यांचे.

ही वस्तुस्थिती वाचून मी खरच हादरले. माझा समज होता कि मुंबई सारख्या ठिकाणी, जिथे स्त्रिया स्व-कर्तृत्त्वावर यशाच्या शिखरांना गवसणी घालतायत, निदान तिथं तरी थोडी वेगळी कहाणी असेल. पण, तिथे ही हीच परिस्थिती असावी? २१व्या शतकातलं एक दशक संपल्या नंतर ही? जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत?

एक युक्तिवाद असू शकतो. दर घरटी एकच मुल ह्या सूत्रामुळे हे प्रमाण व्यस्त राहण्याची शक्यता नक्कीच आहे. त्यावर मला अजिबात शंका नाहीये. पण तरी ही ह्या प्रमाणात असणारा हा फरक निश्चितच justify करता येण्यापलीकडे आहे.

स्त्री मुक्ती आणि ह्या सारख्या अनेक कल्पनांचं पसरलेला लोण आता ओसरतय बहुधा. आणि त्याचे परिणाम म्हणून इतकी वर्ष दुर्लक्षलेली ही परिस्थिती आता अचानक समोर येतेय. हे आकडे भारतासाठी नवीन नाहीयेत. कदाचित महाराष्ट्रासाठी ही नसावेत. पण ही परिस्थिती लाजिरवाणी आहे. आणि अचानक उद्भवलेली परिस्थिती नाहीये ही. एक अतिशय गंभीर समस्या, जिला खतपाणी घालून आपल्याच समाजानी वाढवलंय. आणि आता ह्यावर उपाय शोधायचा म्हणजे नक्की काय करायचं? तहान लाल्यावर विहीर खणण इतका सोप्प असतं का?

स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा देऊन ही परिस्थिती बदलेल असं जर कुठल्या बुद्धिवादी काका-काकूंना म्हणायचं असेल, तर म्हणोत बापडे. पण खरं हेच आहे कि ही परिस्थिती इतक्यात बदलणार आहे असं मला अजिबात वाटत नाही.

ज्या लेखात हे भयावह आकडे मांडले आहेत, तिथेच भारतीय मानसिकतेच चांगलंच 'दर्शन' घडतंय. त्या लेखात लिहिलंय, "आता हमखास मुलाच्या गर्भासाठी स्त्रिया थायलंडपर्यंत भरारी मारायला लागल्या आहेत. कारण तिथे गर्भजल चिकित्सा अधिकृत आहे. एवढंच नाही, तर जीपीडी (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नॉसिस)द्वारा आयव्हीएफच्या तंत्रज्ञानाने कृत्रिम गर्भधारणा करून आपल्याला हवं त्या लिंगाचं बाळ जन्माला घालता येऊ शकतं - सुमारे नऊ हजार अमेरिकी डॉलर्स भरून. जी सामान्यांना परवडणारी नाही... तरीही बॅंकॉकमधल्या या हॉस्पिटलच्या मते गेल्या दहा महिन्यांत या संदर्भात विचारणा करणाऱ्या भारतीय जोडप्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे."
ह्या so called सुशिक्षित आणि सांपत्तिक सुस्थिती असणाऱ्या तरुण भारतीयांचीच जर ही मानसिकता असेल, तर बदल अशक्य आहे.
जन्माच्या आधी किंवा जन्मत:च खुडून टाकलेल्या प्रत्येक पत्री मनानी काय आणि किती यातना सोसल्या असतील ह्याची कल्पना जिवंतपणी येणं शक्यच नाहीये. त्या मरणप्राय वेदनांचा अनुभव हा फक्त त्या प्राप्त परिस्थितीतच घेता येऊ शकेल. आहे कोणाची तयारी हे भोगायची?
स्वत: काही निर्माण करायची क्षमता नसलेला माणूस कोणाचं अस्तित्व कुठल्या हक्कानी संपवतोय?
आणि हे प्रमाण असंच राहिलं, तर उद्या काय होईल ह्याचा विचार केलाय कधी?

हे वाचल्यावर मला एक चित्रपट आठवला. 'मातृभूमी' नावाचा. साधारण १०० वर्षानंतर जी काय परिस्थिती ओढवलेली असेल त्याचं अतिशय ज्वलंत चित्रण केलंय. मिळाला, तर नक्की बघा हा चित्रपट. सबंध पंचक्रोशीत एक ही स्त्री नसणं म्हणजे काय, आणि त्यांनी काय परिस्थिती ओढवते ह्याचा हा एक आढावा आहे. आणि उरलेल्या एकट्या मुलीला नंतर कशी सगळ्या गावाची भूक भागवण्यासाठी गुरांबरोबर गोठ्यात बांधून ठेवलं जातं, तिच्यावरचे अनन्वित अत्याचार, तिची असहाय्यता आणि गावाची भूक: सगळंच अतिशय भयावह .
सहाजिकच ह्या चित्रपटाला कुठल्याही चित्रपटगृहात कधी विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण ज्यांनी बघितलाय, त्यांच्या मनावर ह्या चित्रपटांनी एकदा तरी निश्चितच ठोठावला असणार.

ह्या लेखातून उत्पन्न काहीच होणार नाहीये. ही नुसतीच माझी गंभीर वटवट झाली. पण तुमच्या पैकी कोणालाही कधी एखाद्या ण जन्मलेल्या मुलीला वाचवता आलं ण, तर नक्की करा ते. ह्याची नोंद नक्कीच कुठेतरी घेतली जाईल.

5 comments:

  1. It is a serious matter, There are problems finding Girls for marriageable bachelors already, which means the girls that were born about 20-25 years ago are less. I do not know what will happen 20-25 years from now.

    ReplyDelete
  2. गंभिर विषय चांगल्या प्रकारे मांडलास रुजुता.
    अभिनंदन.

    Matrubhoomi: A Nation Without Women
    http://www.youtube.com/watch?v=6AI9r0pnAhs

    ReplyDelete
  3. ऋजुता, खरचं अशा गंभीर वटवटीची गरज आहे. अभिनंदन!

    ReplyDelete
  4. i didnt know that my daughter has such hidden depths; i m proud of raising a daughter and being a female myself
    keep writing
    u have too much potentials hidden
    which needs a platform
    jay ho vatvat, which is really gambhir

    ReplyDelete
  5. @ Dilip and Shri: Thank you.
    @Rajendra Sir: :)
    @ Aai (Shuchita): You are the all time inspiration! And thanks for your appreciation. It will keep me going. :)

    ReplyDelete